प्रिय वटवट सावित्रीस,
' रंग उमलत्या मनाचे ' घेऊन ' नातीगोती ' हा प्रपंच आपल्या हातात ' लग्नाची बेडी ' पडण्या
अगोदर ' मोरूची मावशी ' होऊ नये आणि ' ती फुलराणी ' बहारण्याआधी आपल्या प्रेमाचा सूर्यास्त होऊ नये हा एकमेव उद्देश ' ध्यानीमनी ' नसताना तू भेटलीस आणि जणू ' उघडले स्वर्गाचे द्वार ' ' कार्टी काळजांत घुसली ' हे जाणवेपर्यंत मी प्रेमाच्या महासागरात गटांगळ्या खात होतो. अखेर वाहतो ' ही दुर्वांची जुडी ' म्हणत माझे हृदय तुझ्या चरणी अर्पण केले. ' देखणी बायको दुसऱ्याची ' हा घरोघरी पसरलेला गैरसमज. जसे ' व्यक्ती आणि वल्ली ' तसे पुरुष आणि प्रवृत्ती पण ' तो मी नव्हेच ' हे तुला शपथपूर्वक सांगू शकतो कारण मी काही ' सखाराम बाईंडर ' नव्हे किंवा ' बेईमान ' ही नव्हे. ' सुंदर मी होणार ' असे आईला सांगितल्यापासून आमच्या प्रिय आईस वेगळाच संशय येऊ लागला आहे.येडा बनके पेडा खाव असे मनाशी ठरवत मी तो विषय टाळला. शेवटी लग्न 'ज्याचा त्याचा प्रश्न ' आणि निवडच करायची तर जे सावित्रीमध्ये आहे ते ' कुसुम मनोहर लेले ' मध्ये नाही आणि ' सविता दामोदर परांजपे ' मध्ये तर नाहीच नाही. ' सासूबाईच असंच असतं ' हे म्हणण्याआधी ' आई रिटायर्ड होतेय ' ही बातमी दिलेली बरी नाहीतर ' चारचौघी ' सारखी तुझी धावपळ नको नाहीतर आपली ' ऑल दि बेस्ट ' जोडी तुझ्या तीर्थरूपांना ' जावई माझा भला ' असे म्हणण्याची वेळ आणतो की नाही ते बघच. ' तू फक्त हो म्हण ' आणि हा सुखद शेवट आपल्याच हाती आहे. मग ' कमाल कसली धमालच आहे ' आणि त्यासाठी तुला यावच लागेल.